जिजाऊ मासाहेब

  1. जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव. या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे. ते कित्येक शतकांपासून या गावचे मूळ रहवासी आहेत. जिकडॆ तिकडे जाधवच जाधव. तुम्ही म्हणाला यात काय नवल. जिजाऊंच आडनाव जाधव होतं. लखुजी जाधवांचं हे गाव. मग ईथे जाधव नसणार तर काय पठाण असणार व्हय? अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे जाधव हे मराठा नसून सगळेच्या सगळे जाधव बौद्ध (महार) आहेत, एक दोन अपवाद असतीलही.  म्हणजे कुठेतरी काहितरी मुरतय? ते नेमकं काय मुरतय हे मात्र सिद्ध करता येणे जरा अवघडच. बरच काही इतिहासाच्या पानांत गुदमरुन गेलं पण तरी हे दोन पुरावे उपलब्ध इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत. दडलेल्या इतिहासाला खोदण्यासाठी खुणावत आहेत.
    जिजाऊंचा वाडा महारवाड्या लगत असणे हा निव्वड योगायोग असूच शकत नाही. अन शिंदखेडचे सगळेच्या सगळे जाधव बौद्ध असणे हा सुद्धा योगायोग नाही. उपलब्ध इतिहास काहिही सांगू द्या, माझा त्यावर विश्वास नाही. वरील दोन जिवंत पुरावे पाहता जिजाऊ माझ्या आहेत असे आतून वाटते. कोणी स्विकारो वा नास्विकारो... जिजाऊ ह्या माझ्या पुर्वज आहेत व त्यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे. या माझ्या मायेने शिवराय घडवला. भारतीयाना ताठ मानेने जगणे शिकविले. प्रत्येक माणसात स्वाभिमान जागविला. संशोधन होऊन आज ना उद्या दोन्ही गोष्टींचा उलगडा होईल तेंव्हा होईल. पण आजच्या घटकेला वरील दोन्ही गोष्टी मझी नाड जिजाऊशी जोडून जातात.

    शंका अशी आहे की एकतर हे दोन्ही समाज समान दर्जाचे असावेत किंवा एकच असावेत किंवा अस्पृश्यता आजून उग्ररूप धारण करायची होती. काय असेल ते

    गंभीरपणे विचार करा ��

    भटट मंडळी म्हणतात की
    "मराठा सेवा संघ "
    " संभाजी ब्रिगेड"
    आणि
    "बामसेफ "
    ने महापुरुषांना जातीत
    विभागले आहे.

    पण इतिहास लिहितांनाच जर जात
    बघून लिहिला असेल आणि तो
    चव्हाट्यावर
    आणतांना जातीचा उल्लेख करावा
    लागत असेल तर तो योग्यच आहे...

    उदा.
    आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक असताना
    वासुदेव बळवंत फ़डकेला
    आद्यक्रांतिकारक केला
    याचे कारण काय ?

    उमाजी नाईक रामॊशी जातितले
    आणि फडके ब्राह्मण समाजातला..

    अशी अनेक उदाहरणे आहेत,
    तात्पुरती थोडी बघुया -

    १ ] पहिल्यांदा सशस्त्र क्रांती करणारे
    उमाजी नाईकांना डावलून फ़डके
    या ब्राह्मणाला पुढे केला.

    २] महाबलाढ्य बादशहा औरंग्याला
    मराठा राणी ताराराणींनी शह दिला
    पण झाशीच्या लक्ष्मीबाईला पुढे
    केले.

    त्याचे कारण
    लक्ष्मीबाई ब्राह्मण.

    ३] सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे
    ज्ञानेदेवाला पुढेकरून चौदाव्या वर्षी
    ग्रंथ लिहिणा-या मराठा संभाजी
    राजांना लपवले..
    कारण ज्ञानेश्वर ब्राह्मण.

    ४] मराठा समाजाच्या जगतगुरु
    तुकोबांचे सहित्य लपवून
    रामदासाचे उदात्तीकरण केले
    कारण रामदास ब्राह्मण.

    ५] शिवजयंती प्रथमत:
    माळी समाज्याच्या महात्मा फ़ुले
    यांनी साजरी केली पण नाव
    टिळकाचेपुढे केले कारण
    टिळक ब्राह्मण.

    ६] घोडखींडीत लढणारे मराठा
    समाज्याच्या संभाजी जाधव लपवून
    बाजीप्रभू देशपांडे समोर आणले कारण बाजीप्रभू कायस्त ब्राह्मण.

    ७] शिक्षणाची सुरुवात आणी प्रसार
    महात्मा फ़ुलेंनी केला पण शिक्षकदिन
    सर्वपल्ली राधाकृष्णच्या नावाने
    कारण सर्वपल्ली ब्राह्मण.

    ८] सर्व भटांना साहित्यात जाळले तरी
    साहित्य उरेल एवढे साहित्य
    मातंग समाजाच्या अण्णाभाऊ
    साठेंनी निर्माण केले
    पण मराठी दिन
    त्यांच्या नावाने नाही..

    याचे कारण कुसुमाग्रज वि वा
    शिरवाडकर ब्राम्हण.

    ९) पंढरपुरच्या विठुरायाची वारी 700
    वर्ष पुराणी परंपरा
    पुसन्यासाठी साईं बाबा पदयात्रा
    गेल्या 30 वर्षा पासून सुरु केली......
    कारण साईंबाबा ब्राह्मण पेशवा

    १०) अक्कलकोटचे स्वामी & गजानन
    महाराज हे दोघेही पेशवा ब्राह्मण
    म्हणून त्यांचे उद्दात्तिकरण.

    आणि खंडोबा, ज्योतिबा, बिरोबा हे
    बहुजनांचे महानायक म्हणून त्यांच्या
    नावे अंधश्रद्धा.

    ११) भारत देश 2500 वर्ष पुर्व पासून बौद्ध परंपरा पाळणारा ............पण बोलबाला ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी
    विचाराचा !

    १२) शिंपी समाज्याच्या नामदेवांनी
    वारक-यांची वारी सुरु केली.....
    पण ज्ञानदेवे रचिला पाया
    कारण ज्ञानदेव ब्राह्मण.

    १३) आयुर्वेद & योग लिहिले
    मूलनिवासींनी आणि चोरून खपवले
    पतंजलीच्या नावे
    कारण पतंजली ब्राह्मण

    १४) भारताची मुळची भाषा
    मगधि आणि पाली
    पण प्रतिष्ठा दिली आणि इतिहासात
    सांगितली संस्कृत कारण ती केवळ
    ब्राह्मणांना येत होती

    १५) सामान्य माणसाची गण व्यवस्था
    झाकन्यासाठी गणपतीला आद्य
    दैवत केले.
    गणपतीला ब्राह्मणांनी प्रचारात आणले

    हे सगळं आणि प्रतेक
    गोष्टीत असे का घडले ????
    की प्रतेक चांगल्या आणि मुळच्या गोष्टी इथल्या मूलनिवासी लोकानी केल्या
    परन्तु त्याचे जनक हे ब्राह्मण
    म्हणून आम्हाला शिकवले गेले...

    इथे जातीचा संबंध
    होता की नाही ? ??


Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास