भिल्ल व रामोशी कोण होते? महाराष्ट्रात त्यांचा इतिहास काय आहे?
हि माहिती कदाचित खुप कमी लोकांना माहित आहे कारण या समाजातील खुप कमी लोक quora वर आहेत .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या समाजाबद्दल जास्त माहिती मिळते .
शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांचे गुप्तहेर हे मुख्यतः रामोशी समाजाचे होते , आणि या समाजाचं किल्ल्यांची सुरक्षा करणे हे काम होत .
किल्यांच्या बाहेर किंवा किल्ल्याभोवती रामोशी समाज्याच्या लोकांची घर असावीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नियम होते .
शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक' हे रामोशी समाजाचे होते .
ते शिवाजी महाराजांचे सर्वात निकट होते स्वराज्य निर्मितीपासून ते संभाजी महाराजांच्या मृत्यू पर्यंत ते स्वराज्याची सेवा करत होते .
महाराजांची कोणतीही मोहीम असो जोपर्यत नाईकांचा संदेश येत नव्हता तो पर्यंत महाराज आगेकूच कात नवते .
ज्यास्त माहिती साठी इथे भेटू शकता .
बहिर्जी नाईक कोण होते ? सविस्तर माहिती - HDmarathi
त्याच बरोबर
भिल्ल व रामोशी त्यांच्यापासून आपल्या भारताच्या स्वातंत्र संग्रामाला सुरवात झाली होती ," राजे उमाजी नाईक" यांनी सर्वात प्रथम ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध केलं होत आणि ज्यावेळी युद्धापासून इंग्रज जिंकू शकले नाहीत त्यावेळी त्याच्याच साथीदारांना त्याच्या विरोधात उभे करून त्याना पकडण्यात आलं .
ह्या संग्रामात जवळपास २० हजार रामोशी समाजाचे लोक राजे उमाजी नाईक यांचा साथ देत होत .
म्हणून ब्रिटींशांच्या काळात रामोशी समाजाला एक criminal जात म्हणून घोषित करण्यात आलं कारण त्याना समजलं होत कि जर दुसरे लोक यांच्याशी मिळाले तर आपली सत्ता संपुष्ठात येईल .
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिळालेल्या जमीनी जप्त करून घेण्यात आल्या त्यामुळे या लोकांना अन्न पाण्यासाठी इंग्रजांच्या ठिकाणांवर दरोडे टाकायला सुरुवात केली .
या समाज्याच्या लोकांना थांबवण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या समाजात दारूची लत लावायला सुरुवात केली त्यामुळे या समाजाला उत्तरती कला लागली .
त्यानंतर आता सुध्या या समजला एक criminal tribe म्हणून जाणले जाते .
रामोशी समाजाला "रानवाशी किंवा रामवंशी " असे म्हणतात, हि एक क्षत्रिय जात आहे .
हो हि एक worrior कास्ट आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासात पूर्ण माहिती आहे त्यांच्याबद्दल .

Comments
Post a Comment