पालक नव्हे ;मित्र बना

पालक नव्हे ;मित्र बना
********************
आई माझा गुरु
आई कल्पतरु
सौख्याचा सागरु
आई माझी
 साने गुरुजींच्या या  ओळी
किती सार्थ आहे मुलांच्या जीवनात मातापित्याचे स्थान मोठे आहे आई सुसंस्कार घडवते .चालायला बोलायला शिकविते.
  वडील कमावून आणताता प्रृपंचाचा भार वहातात कुटुंबासाठी झटतात.आईवडील प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करुन मुलांच्या हौसमौजेकडे लक्ष देतात त्यांचे कोडकौतूक करतात.
  आजचे आईवडील नोकरी करतात मुले पाळणाघरात वाढतात हम दो हमारा एक यामुळे त्यांना शेअरींग काय असते हे समजत नाही दुस-यासाठी काही करायचे असते हे कळत नाही मी माझे ही भावना वाढीस लागते
  यासाठी मुलांना लहान
  वयातच वळण लावणे महत्वाचे ठरते
 आजची पिढी अत्यंत बुध्दीमान आहे मुले अनुकरण प्रिय असतात मोठे वागतात त्याःचेच ते अनुकरण करतात यासाठी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे स्वयंशिस्तीची गरज आहे. मुलांचे लाड करावेत पण फाजिल लाड नकोत.त्यांना" नाही "हा शब्द ऐकण्याचीही सवय लावली पाहिजे,
  मुलांशी मैत्री केली पाहिजे त्यांना आईवडीलांशी मनमोकळेपणाने संवाद साधता आला पाहिजे असे मोकळे वातावरण मैत्रीपूर्ण वातावरण घरात आसले पाहिजे
शैशव, पौगंडालस्था तारुण्य प्रोढपण जरापण या मानवी आयुष्याच्या अवस्था आहेत मुलांना शैशवावस्थेत लाड प्रेम करावेत पण शिस्तही हवी स्वावलंबन शिकवावे
पौगंडावस्थेत तर मुलांचे मन फार जपले पाहिजे त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ते कसे आहेत याकडे लक्ष द्यायला हवे हे मुलांशी सुसंवाद करुनच शक्य आहे
 काय चांगले काय वाईट याची त्यांना जाणीव करुन दिली पाहिजे आजचा विद्यार्थी शिक्षणाच्या ओझ्याखाली दबून गेलाय स्पर्धेच्या युगात टिकून रहावे यासाठी ट्यूशन शाळा हाँबीज यात तो भरडून निघतोय काही काही घरातून मुलांवर तू डाँक्टरच हो अमुकच हो अशी पालकांची इच्छा असते मुलाचाकल वेगळाच असतो अशावेळी त्याला अपयश येते मग त्याला आईवडीलांची भिती वाटते तो आत्महात्या करतो घर सोडून जातो मित्रमंडळीत रमतो घराचे घरपण हरवून जाते यासाठी पालकांनी प्रथम मुलांचा मित्र बनले पाहिजे त्याचे विचार त्याचा कल जाणून घेतला पाहिजे त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे
 पैशाने सारे विकत घेता येत नाही मुलांना आपला विश्वास वाटला पाहिजे यासाठी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे चांगल्या वाईटाची जाण दिली पाहिजे .
 मुलांर माया प्रेम करा गोडी गुलाबुने समजावून सांगा मुलांचे मित्र बना
 माझ्या घरचेच उदाहरण देते आम्ही दोघेही नोकरी करत होतो मी रेल्वेत होते मुलीच्या जन्मानंतर मुमी नोकरी सोडली कारण पाळणाघरात आम्हाला तिला ठेवायचे नव्हते घरी सांभाळणारे कुणी नव्हते मग मी घरी राहिले तिचा आभ्यास संस्कार याकडे लक्ष दिले नंतर मुलगा झाला तो शाळेत जाऊ लागल्यावर पार्टटाईम नोकरी धरली मुलांवर योग्य ते संस्कार आम्ही दोघांनीही केले .
मुलगी इंजिनिआर झाली परदेशात गेली पण आपले संस्कार टिकवून आहे मुलगा mbaकरतोय दोन्ही मुले गुणी आहेत आम्हाला फार जपतात माझ्या मिस्टरांच्या आजारपणात मुलाने आपृले करियर सोडले पण त्यांची सेवा केली नुकतेच ते गेले
मुलीने आम्हाला तिच्याबरोबर परदेशात नेले आम्ही एकमेकांना साथ देत आहोत मुलीच्या मुलाच्या आवाजात जरी बदल झाला तरी मला समजते इतके आम्ही एकरुप आहोत
  माझ्या डोळ्यांचे आँपरेशन झाले तर मुलाने स्वतः स्वयंपाकही केला मला गँसजवळ जाऊ दिले नाही मुलीला रजा नाही मिळाली पण आर्थिक भार ती सांभाळते मला आमच्या दोन्ही मुलांचा आभिमान आहे मी आई असले तरी आता बाबाःचीही भूमिका मलाच पार पाडायचीय पण त्या आधी मी माझ्या मुलांची मैत्रिण आहे मुले माझ्याशी सर्व स्तरावर चर्चा करु शकतात हेच माझ्यासाठी महत्वाचे .

प्राची देशपांडे

Comments

Popular posts from this blog

१.महार

महार

भंडारी समाजाचा इतिहास