कुंभार समाज प्राचीन काळापासून मातीपासून मूर्ती, भांडी, विटा तयार करण्याचे काम करीत आहे.
कुंभारकामास लघु उद्योगाचा दर्जा द्या!
Manoj Dinkar Kulkarni | Maharashtra Times | Updated: 17 Apr 2016, 03:00:00 AM
कुंभार समाज प्राचीन काळापासून मातीपासून मूर्ती, भांडी, विटा तयार करण्याचे काम करीत आहे. या पारंपरिक व्यवसायावरच समाजाचे जीवन अवलंबून आहे. पूर्वीच्या काळात परंपरागत व्यवसाय करणे किफायतशीर होते. मात्र, वाढते नागरीकरण, मालाला उढाव नसणे व औद्योगिकीकरण तसेच व्यवसायाकरिता लागणारे इंधन, माती आणि पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने या व्यवसायाला घरघर लागली आहे. त्याचा परिणाम कुंभार समाजाच्या प्रगतीवर झाला. कुटुंबाच्या प्राथमिक गरजाही पूर्ण होणे अवघड झाले आहे. त्यामुळे कुंभारकामास लघु उद्योगाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत आहे.
Sudhir.Bhalerao
औरंगाबाद: कुंभार समाज प्राचीन काळापासून मातीपासून मूर्ती, भांडी, विटा तयार करण्याचे काम करीत आहे. या पारंपरिक व्यवसायावरच समाजाचे जीवन अवलंबून आहे. पूर्वीच्या काळात परंपरागत व्यवसाय करणे किफायतशीर होते. मात्र, वाढते नागरीकरण, मालाला उढाव नसणे व औद्योगिकीकरण तसेच व्यवसायाकरिता लागणारे इंधन, माती आणि पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने या व्यवसायाला घरघर लागली आहे. त्याचा परिणाम कुंभार समाजाच्या प्रगतीवर झाला. कुटुंबाच्या प्राथमिक गरजाही पूर्ण होणे अवघड झाले आहे. त्यामुळे कुंभारकामास लघु उद्योगाचा दर्जा द्यावा, अशी मागणी होत आहे.
कुं भार समाज महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. राज्यात या समाजाची लोकसंख्या सत्तर लाखांपेक्षा अधिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. सव्वा लाखांपेक्षा अधिक संख्येने हा समाज जिल्ह्यात निवास करून आहे. कुंभार समाज हा अत्यंत कष्टकरी म्हणून ओळखला जातो. कुंभारकाम या पारंपरिक व्यवसायातून प्राप्त उत्पन्न अत्यल्प असल्याने कुंभार समाज आर्थिकदृष्ट्या मागे पडलेला दिसून येतो. कुंभार समाजाचा इतिहास गौरवशाली असला तरी सद्यस्थितीत हा समाज कष्टप्रद जीवन जगत आहे.
कुंभार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने या समाजासमोर अनेक अडचणी आहेत. अनेक आव्हानांचा सामना जुन्या पिढीबरोबरच युवा पिढीला करावा लागत आहे. विखुरलेल्या समाजाला संघटित करण्याकरिता महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाची स्थापना १९९२मध्ये करण्यात आली. त्यानंतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला एकत्रित आणण्याचे काम महासंघ करीत असल्याचे युवा आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय जोरले यांनी सांगितले. महाराष्ट्रात कुंभार समाज हा मोठ्या संख्येने असला तरी विखुरलेला असल्याने शासन आणि लोकप्रतिनिधी समाजाच्या वाजवी मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी समाजाची धारणा झाली आहे. काही वर्षांमध्ये शासन समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देत असले तरी ठोस उपाययोजना अद्यापही आखल्या गेलेल्या नाहीत, अशी खंत महासंघाला वाटते.
मातीकला बोर्डाची स्थापना
कुंभार व्यवसायाचे आधुनिकीकरण तसेच समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक असा सर्वांगिण विकास करण्याकरिता गोरोबा काका मातीकला बोर्ड स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ १९९७पासून करीत आहे. गेल्या दोन वर्षांत मातीकला बोर्ड स्थापन करण्याविषयी शासनस्तरावर हालचाली होत आहेत. मात्र, अद्यापही काहीच ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मातीकला बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. या बोर्डाची राज्यात स्थापना करण्यात आली, तर कुंभार समाजाला प्रगतीची दिशा मिळू शकेल, असे संजय जोरले यांनी सांगितले.
समाज भवन, वसतिगृह
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ औरंगाबाद शाखेचे पदाधिकारीः अध्यक्ष भागीनाथ मरकड, कार्याध्यक्ष मनोहर तांगडे, उपाध्यक्ष दत्तात्रय गरसुळे, सरचिटणीस रामदास इंगळे, सहसचिव प्रकाश बाळसकर, कोषाध्यक्ष अशोक म्हस्के. अन्य पदाधिकारीः रणजित ढौलणपुरे, श्याम पल्लये, सुभाष जोरले, विजय पेंढारकर, प्रेम पेंढारकर, रमेश गेंदे, भगवान शिरसे, कैलास संत्रे, गजानन गोधेकर, ज्ञानेश्वर बरांडे, विनोद मोरे, दीपक चव्हाण, संतोष गेंदे, चंद्रकांत टेंभरे, कृष्णा जोरले.
जिल्हा युवा कार्यकारिणीः मनोज कस्तुरे, सुदाम चव्हाण, ज्ञानेश्वर जोरले, चंद्रकांत पल्लये, विजय पेंढारकर, रवी मरकड, प्रकाश बरांडे, दीपक गेंदे, राजेंद्र पेंढारकर, कृष्णा गोरखे, राम ढौलणपुरे, रामेश्वर पल्लये, किशोर संत्रे, कृष्णा जोरले, निखिल पेरिया, भरत ढौलणपुरे.
महिला पदाधिकारीः प्रदेश उपाध्यक्ष अंजली मांडवकर, जिल्हाध्यक्ष मीरा जाधव.
Comments
Post a Comment