महाराच्या गळ्यात मडके का आले?
(---------चंद्रा महार--------)
महारांच्या गळ्यात थुंकण्यासाठी मडकं आणि कमरेला झाडू कसा आला ? का असे घडले? खरच महार समाज ईतका घाणेरडा होता.का?"
महार समाजाचा इतिहास हा शौर्यांचा इतिहास आहे.त्यांच्याइतके साफ - स्वच्छ,प्रगत कुणीच नव्हते..मग गळ्यात मडके आणि कमरेला झाडू अचानक कसे आले.?
एकदा रघुनाथ पेशव्याची पत्नी आनंदाबाई पेशवे आपल्या दासींसोबत फिरायला निघाली.अगोदरच पेशवे घराणे स्त्री लंपट आणि पुरुष लंपट होते.अचानक आनंदाबाई ला मातीवर
एका पुरुषाच्या पावूल खुना दिसल्या.त्या पाउल खुणा सर्व
सामान्य माणसापेक्षा मोठ्या आणि आकर्षक होत्या.
ती त्या पाऊल खुनावरच ती भाळली.तिने त्या पाउल खुना कुनाच्या आहेत याचा शोध घ्यायला लावले.शोधातून समोर आले की त्या पाउल खुना चंद्रा नावाच्या महार लोहाराच्या होत्या.
त्यावेळेस महार समाज राजांचे शस्त्र बनविन्याचे आणि युद्धात
लढाई करण्यात शौर्यवान होते.
जेव्हा आनंदाबाई त्याला पहायला गेली तेव्हा तो तलवार
बनविण्याचे काम करत होता.त्यामुळे सहाजिकच
त्याच्या कामामूळे त्याचे शरीर पिळदार झाले
होते.उष्णतेमुळे अंगावर अगोदरच कमी कपडे
होते.त्यातल्या त्यात तेव्हा महार समाजाचे
लोक कस्तुरीयुक्त पान खात होते.ज्यातुन सभोवताल सुगंध दरवळायचा.
चंद्राचे पिळदार शरीर आणि कस्तुरीयुक्त पानाच्या तोंडून येणारया सुगंधाने तिची कामवासना जागृत झाली.तिने त्याला राजवाड्यावर बोलविले.तिच्या नजरेतील कामवासना चंद्रा च्या वडिलांनी ओळखली.त्याच्या वडिलाने त्याला राजवाड्यावर जावू दिले नाही. राणी ला हा अपमान वाटला. एक राणी जर
चंद्रा सारख्या महारावर भाळत असेल तर तिच्या राज्यातील इतर साध्या स्त्रियांची काय स्थिती होत असेल...हा तिला प्रश्न पडला?
चंद्रा वाड्यावर आला नाही म्हणून तो एक राणीचा अपमान होता.त्याचा सुड म्हणून रघुनाथ पेशवेच्या सहीने तिने राज्यात
फर्मान काढला की .."यानंतर महारांच्या गळ्यात मडके आणि कमरेला झाडू राहील."हे यासाठी की कोणत्याही महाराच्या तोंडुन कस्तुरीयुक्त पानाचा सुगंध कुणास जावू नये आणि ती थुंकी तो मडक्यातच थुंकेल आणि कमरीला मातीवर सरपटणारा झाडू यासाठी की कोणत्याही महाराच्या पाउल
खुणा मातीवरच्या पाहून जर राणी भाळू शकते तर इतर स्त्रियाही भाळतील म्हणून महारांच्या कमरेला झाडू लटकविण्यात आला."
याचाच अर्थ असा होतो की आम्ही गबाळ ,अस्वछ नव्हतोच.आमचा इतिहास हा अभिमानास्पद होता.जो ब्राम्हणांच्या कामवासनेने नासवला.
पेशवे तर सोडा परंतू महार समाजाच्या अंगी असलेले पराक्रम,शूरत्व व लढवय्यपणा इंग्रजांच्या हि पारखी नजरेतून सुटले नाही त्यांच्या ह्या गुणांचा पुरेपुर उपयोग पेशव्यांच्या विरोधात करून २५००० पेशवाई फक्त ५००महारांनी उभी कापून काढली.एक महार ५६ जणांना पुरुण उरत होता.पेशवे भांबावल्यासारखे न लढताच सैरावैरा नुसतेच पळत सुटले.
पेशवाई हारली..आली..पुर्णपणे नेस्तनाबूत करून टाकली आणि तेव्हा पासूनच एक म्हण पडली ती अशी कि तुझ्यासारखे असे छप्पन पाहिले..
ह्या म्हणीचा खरा इतिहास हा आहे..
इंग्रज मात्र खूपच खुश झाले आणि ह्या खुशीच्या बदलल्यात महारांना इंग्रजांनी जमीनी बहाल केल्या..आणि त्यांची आठवण म्हणून विजयस्तंभ बांधण्यात आला.त्या विजयीस्तंभावर ५०० महारांची नावे कोरण्यात आली..
तोच तो १८१८ सालचा भीमाकोरेगाव.आणि म्हणून ह्या पराक्रमी शूरवीरांना वंदन करण्यासाठी मी १ जानेवारीला न चुकता जातो.
कारण ते जर लढले नसते तर आपले अस्तित्व हि असून नसल्यासारखेच असते..
Comments
Post a Comment